हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करणं आवश्यक असल्याचं मत, प्रसिद्ध हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत ‘बदलत्या हवामानाचे आव्हान’ या विषयावर ते बोलत होते. हजारो वर्षांपासून पृथ्वीवर सूर्यामुळे आणि सूर्यावरील सौर डागांमुळे हवामानामध्ये थंड, गरम किंवा अति पर्जन्य वृष्टी असे बदल वेळोवेळी होत असतात. या बदलामुळे मानवी जीवनावर आणि शेतीवर तथा शहरीकरणावर परिणाम होणार आहेत. अशा होणाऱ्या परिणामांचा वेळेआधीच अभ्यास करून समाजाला अगोदरच सुचित करता येतं, त्यासाठी हवामान अभ्यास चळवळ उभारावी लागेल, असं ते म्हणाले.
Home ठळक बातम्या हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांत कालानुरूप बदल आवश्यक – हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे
Recent
राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींपैकी एक ए जी पेरारिवलन याची सुटका
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींपैकी एक ए जी पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तामिळनाडू...
राष्ट्रीय बातम्या
स्टार्ट अप्स ना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर...
राष्ट्रीय स्टार्ट अप सल्लागार परिषदेने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवर्गातल्या शहरांवर लक्ष केंद्रित करून तिथल्या नव उद्योजकांना भांडवल पुरवठा आणि क्षमता वर्धन करणं, तसंच...